Posts

Showing posts from October, 2009

असे वाटते

असे वाटते ऊंच उडणार्या पक्षा प्रमाणे कधी तरी मुक्त फिरावे । तर कधी वार्याचा झोक्यावर मस्त झुलावे । तर कधी भुग्यांप्रमाणे फुलाभोवती भिरभिरावे । तर कधी सरिताहोउन कोणासाठीतरी डोंगरातून वाहतच रहावे । कधी कोणासाठी बेभान व्हावे , तर कधी पावसाच्या थेबाप्रमाणे प्रितीत विरघळूण जावे ।

हे अस का असत ?

हे अस का असत ? सत्याची बाजू पकड़नार्याला सुखाच जगन का नसत ? हे अस का असत? युगांयुगे हे असच चालत आल , सत्याला नेहमीच झगडाव लागल । सीतेला द्यावी लागली अग्निपरीक्षा , पांडवानाही भोगावी लागली वनवासची शिक्षा. सोन्यालाही उजळून निघाव लागत । बराच वेळ हिरकणीलाही कोळशासोबतच रहाव लागत। हे अस का असत? सत्याची कास धरलेला सामान्य माणूस , जेथे असतो तेथेच राहतो । पापी मात्र सत्याचा मुखवटा चढवून उघड मथ्याने फिरतो । सत्याला आशा असते "पापाचा घडा एक दिवस भरणार, त्याची चूक त्याला कळणार, आणी एक दिवस पापाचा घडा फुटणार" पण सत्याला न्याय मिळतामिळता त्याच अर्ध आयुष्य निघून जात। आणी त्याच आनंदाचे क्षण वेचण्याच स्वप्न कोठेतरी हरवून जात .